Saturday, 15 September 2018

इंजिनियरिंगचा समुद्र

इंजिनियरिंग कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश केल्यावर सहजगत्या कोणालाही विचारलत कि तुला काय व्हायला आवडेल ? तर अर्ध्याहुन जास्त जणांनकडून 'इंजिनियर सोडून अमुक तमुक व्हायला आवडेल' असच उत्तर येइल. शहराच्या एका कोपऱ्यात अस्ताव्यस्त पसरलेल्या ह्या चाळीस एकराच्या कॅम्पस मधल प्रत्येक डोक हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेलि स्वतंत्र्य शाखा आहे . इथला शिपाई सुधा करंट अफेयर्स,मराठी साहित्य असल्या विषयांवर तुमच्याशि तासभर बोलायला कमि पडणार नाही. हे कॉलेज म्हणजे वाटा चुकलेल्या गुणवंतांचा मेळाच.
हा अतिष पतवारी , त्यान जन्मापासूनच नट व्हायचा घ्यास घेतलाय. कॉलेजच्या नाटक कंपनीचि धुरा पत्या एकहाती सांभाळतो. यावर्षी फिरोदिया मारायचच ह्या ध्यासान त्याला पछाडलेल आहे. दिवसभर पहिल्या मजवल्यावरचा ड्रॉईंग हॉल मधे यांच काहीतरी सुरू असत. हॉस्टेल मधे आल्यावरही आरशामोर उभा राहून मार्लोन ब्रांडो सारखा घोगरा आवाज काढत तो डायलॉग बडबडत राहायचा. विकी आणि पत्याच्या तासांतस गप्पा चालायच्या. विकीला सिनेमॅटोग्राफीच वेड होत. रामगोपाल वर्मा टायरला कैमरे लावून घेतो तसे शॉट कसे घेतात,साय-फ़ाय फिल्म्स चित्रित करण्यासाठी कुठली नवीन तंत्रज्ञान जगात आहेत इथपासून ते अमूक तमूक फिल्म कुणि शूट केली इथपर्यंत सगळी इत्यंभुत माहिती त्याच्याकड मिळायचि. विकी आणि पत्या एकत्र सिनेमा,नाटक बघायला बसले की त्याच पोस्टमार्टमच झालच म्हणून समजा. समविचारी आणि सम:दुखी माणस एकमेकाच्या फार जवळचि असतात.
सई समोरून चालत जरी आली तरी रॅम्प वॉक करत येतिये अस वाटायच इतक मॉडलिंग तिच्यात भिनल होत.    अलिबागच्या लेटेस्ट फोटोशूटचा अल्बम आम्हाला तिन फार उत्साहाने दाखवला होता. फोटो पाहून झालेले 'कैसी जिभ लपलपाई' टाइप चेहरे बघून तिन आम्हाला 'ह्ये गाइज प्लीज कुठ बोलू नका हा हे,बाबाना कळल ना तर हाय हिल्स नेच मारतिल मला' अशि ताकीदवजा विनंती केलि. तिचा बाबा आमच्याच कॉलेजात प्रोफेसर होता.
भूषाला त्याच्या अकरावी-बाराविच्या मोहिते सरांसारख गणिताच प्राध्यापक व्हायच होत. पोराना गणित आणखी सोप करून शिकवायच होत. पण त्याच गणिताकडून घात झाला आणि मॅथ्सला जास्त मार्क्स आल्यामुळे सीईटिचा स्कोर दिडशेच्या घरात गेला. एवढे कच्चून मार्क्स भेटल्यावर बि.एसी ला प्रवेश घेन हा गुन्हा आहे. कुठल्या तरी लांबच्या मामान आमच कॉलेज सुचवल. आजही तो कधीमधे बॅग  मधे अर्धवट भरूलेला बी. एसी एडमिशनचा फॉर्म बघून हळहळत असतोय. ते अपुर स्वप्न अजुन त्यान जपून ठेवलय. आमच्या सारख्यांचा एम्-2 सुटला तो भूषाच्याच शिकवन्यान !
एकनाथ चौरे उर्फ़ नाना यांची तर कथाच वेगळी. आख्या गावातून इंजीनियरिंगला आलेला हा पहिला पोरगा. पण ह्याच मन अजूनही गावातच रमत. अॅग्री करून घरच्या शेतित नवनविन प्रयोग करायच मनात होत त्याच्या. पण 'शेती करून कुणाच भल झालय,पोरगी  कोण द्यायच रताळ्या तुला ?' अस म्हणत बापान इकड़ पिटाळून दिल. नानाला सबमिशन पेक्षा म्हशीन रेडकाला पाजल की नाही,दोन आठवडे झाले तरी फाट्याला पाणि कस काय येईना याचीच जास्त काळजी लागलेली असायची. कधि गावाकडच्या आठवणीत दुःखी असलेला नाना दिसला की पोर त्याला 'अरे ह्याला कुणीतरी शेना-मुताच्या वासाचा बॉडी स्प्रे द्यारे आणून म्हणजे हा खुश राहिल' असले काहीतरी टोमने मारत आणखी चिडवायची.
इथ असच आहे. कुणाला ग्रेसच्या कवितांवर पि. एचडी करायची आहे, मुक्त पत्रकार म्हणून काम करायचय,एखाद्याला गायक,क्रिकेटर व्हायचंय. ज्याला खरच मॅक्यानिकल करायचि इच्छा होती त्याला एक-दोन मार्क्स कमी भेटल्या मुळ दुसऱ्या शाखेत इंजीनियरिंग कराव लागतय. कुणाला डॉक्टर व्हायच होत पण नियतीने या चक्रात ढकलल. आणि त्यात भरीस भर म्हणून आमच्या सारख्या 'ऐमलेस' लोकांची निवांत आणि दिशाहीन जमात. ह्या अशा सगळ्यामुळ 'विविधतेत एकता' हे मुल्य घेउन जगणारी इंजिनयरिंग ही शिक्षण क्षेत्रातली एकमेव विद्याशाखा आहे.
रात्री होस्टेलच्या गच्चीत पतवारी एकटाच उभा असलेला दिसला. 'काय पत्या आज काय इथ एकांताला सोबत घेउन एकांकेचि तालिम चालू आहे की काय' अस उसनच म्हणत त्याला विचारांच्या तंद्रीतुन बाहेर काढल.
'कुठलि तालीम आणि कसल काय. हेल्पलेस झाल्यासारख वाटतय. आज वडिलानि जाम खरडपट्टी काढली प्लेसमेंटला का बसत नाही,पुढचा काही विचारच केलाय का हे असल नेहमचिच बोलण. जॉब वगरे नाही पटत नाही रे, पूर्णवेळ थिएटर करायची इच्छा आहे माझी. जाऊदेत साला त्यांच तरी काय चुकत म्हणा..'
'मग इकडे कशाला आल रे तू तिकडच जायच की तसल एन्एस्डी वगरे..'
'आता वाटतय तस,पण खर सांगू का..साला इथं इंजिनियरिंगला आल्यावरच कळत की आयुष्यात आपल्याला नेमक काय करायला पाहिजे होत..!' उगाचच हसत त्यान उत्तर दिल.
इथ असच आहे. सई,नाना,भूषा,पतवारी सारख्या विविध गुणधर्म असलेल्या कितीतरी नद्या ह्या इंजिनियरिंग नावाच्या समुद्राला येउन मिळतात आणि त्यातच बेमालुमपणे मिसळून जातात. दोन रंग एकमेकात मिसळल्यावर कितीहि मोहक छटा तयार झालि तरीही तयार झालेल्या नव्या रंगाला स्वत:च मुळ अस्तिव राहत नाही. या नद्यांचही तसच होत. चार वर्षात इंजिनियरंगचा समुद्र या नद्याना पूर्णपणे एकरूप करून घेतो आणि अशि काही नविन ओळख देतो की पुन्हा आयुष्यभर नदिलाही विसराव लागत की आपला नैसर्गिक गुणधर्म , आवडीनिवडी काय होत्या.

- अक्षय मासाळ
#HappyEngineer'sDay

Saturday, 27 May 2017

सर्वव्यापी सावरकर


विनायक दामोदर सावरकर हे फक्त नाव जरी घेतल की डोळ्यासमोर उभा राहतो एक धगधगता क्रांतिसूर्य. उभ आयुष्य देशाच्या,हिंदू समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य खर्ची घातलेला स्वातंत्र्यविर. इतक असुनही सावरकर हे नाव घेताना सुधा आजही काही 'धर्मनिरपेक्ष' लोकाना संकोच वाटतो. त्यांचि प्रतिमा संसेदत लावताना ठरवून द्वेषबुद्धीने विरोध केला जातो. विरोध करानाऱ्या द्वेष्ट्या पैकी निम्म्यानि सुधा सावरकर वाचलेले नसतात. कारण त्यानी वाचले असते तर विरोध केलाच नसता. सावरकर जितके तुम्ही वाचत जाल तितके ते तुम्हाला आपले वाटत जातील. त्यांच्या 'माझी जन्मठेप' मधला प्रत्येक अनुभव अंगावर रोमांच उभा करेल. 'सागरा प्राण तळमळला' वाचताना,ऐकताना तुम्ही हळहळल्या शिवाय राहणार नाही.'जयोस्तुते'चा एक एक शब्द चेतना जागवतो. सशस्त्र क्रांतिला असलेले त्यांचे योगदान,लंडन मधे राहून केलेल क्रांतिकार्य हे आजही प्रेरणादायी राहिल ठरेल असेच आहे.
हिंदुत्व हा शब्द सावकरांच्या उल्लेखा शिवाय पूर्ण होत नाही. नास्तिक असलेल्या सावरकरानि आयुष्यभर हिंदूत्वाचा पुरस्कार केला. सावरकरांच्या हिंदूत्व या संकलपनेचा प्रत्येकजण आपल्या परीने अर्थ घेत असतोय. सावरकराना अभिप्रेत असलेला हिंदू शब्दाचा अर्थ हा सर्वव्यापी आहे. हिंदूस्थानला पितृभू आणि पुण्यभू मानननाऱ्या प्रत्येकाला ते हिंदू म्हणतात. हिंदूत्व हे आपल्या परंपरा,संस्कृति यांच प्रतिक मानतात. इतकी व्यापक आणि सर्वाना सोबत घेउन जाणारी दूसरी हिंदूत्वाची व्याख्या कोणीही केलि नसेल. शिवाजी महाराजाना 'हिंदू नृसिंह' संबोधनाऱ्या सावरकरानि हिंदूचा शौर्याचा गौरवशाली इतिहास 'सहा सोनेरी पाने' मधून मांडलाय. त्याबरोबरच 'क्ष-किरणे मधून हिंदू धर्मातल्या अनिष्ठ रुढी परंपरांचि कठोर चिकत्सा करायला सावरकर कुठेही कचरले नाहीत. गाईला देव माननाऱ्या धर्मांध हिंदुना उपोरधिकपणे त्यानी सुनावल आहे पण त्याचवेळी गाईला जर क्रूरपणे,द्वेषबुद्धीने कोणि मारत असेल तर त्याचा हात पकड़न हे आपल कर्तव्यच असल्याच सांगतात. दिवाळी सारख्या सणाच सास्कृतिक महत्व हि त्यानी सांगीतलय. सावरकर विज्ञाननिष्ठ आहेत. आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे सावरकर विज्ञानाचे महत्व जानुन होते. विज्ञानच मुस्लिम समाजातल्या धर्मवेडेपणाला आणि हिंदू समाजातल्या अनिष्ठ रुढीना संपवू शकतो याची त्याना खात्री होती.
ज्या एका क्षेत्रात नाव कमावन्यासाठी माणुस आयुष्यभर झटतो त्या प्रत्येक क्षेत्रात सावरकरानी नाव कोरुन ठेवलय. ते सिद्धहस्त कवि,नाटककार,इतिहासकार आहेत.  अटलबिहारी वाजपेयीनि एका भाषनात त्याना 'शब्दों के शिंपी' अस म्हंटलय,ते शब्द लिलया गुंफणारे तर होतेच पण शब्दांचे निर्मातेही होत. वार्ताहर,महापौर,उच्चांक,नगरसेवक,स्तंभ,दिग्दर्शक असे कितीतरी रोजच्या वापरातले शब्द सावरकरांचे आहेत. त्यांची 'भाषाशुद्धि' हा माय मराठीला लाभलेली देणगी आहे.
जाति हा हिंदू धर्माला असलेला शाप आहे. त्यासाठी सावरकरानी जात्युछेदनाची चळवळ चालू केलि. पतितपावन मंदिर,हिंदू बैंड,हळदी कुंकू समारंभ अशा अनेक मार्गानि त्यानी त्यांचा जात्युछेदनाचा लढा चालू ठेवला. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करताना ते विज्ञानतल्या 'संकर' या संकल्पनेचा आधार देतात.
'मि मेल्यानंतर माझे शरीर विद्युतदाहिनित झोकुन द्या' अस सांगुन सावरकर त्यांच्या कृतिमधुन पुरोगामी ठरतात. 'विद्युतदाहिनी' हा शब्द सुधा त्यांचाच !
इतका सगळ असुनही केवळ राजकीय स्वार्थापायी उपेक्षित ठेवले गेलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे जगातले एकमेव क्रांतिकारक असावेत. आजही   सद्य सामाजिक स्थितिमधे पदोपदी सावरकरानी देऊन ठेवलेल्या ईशाऱ्यांचि आठवन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आपण सगळ्यानिच सावरकरांचा विचार वाचुन आचरनात आणन गरजेच वाटत.    त्यांचे विचार चिरायू आहेतच फक्त आपण त्याला कृतिची,आचरनाची जोड़ द्यायची गरज आहे. राजकारन्यानि सुधा आपली वैयक्तिक स्वार्थ लांब ठरवत सावरकर विचारांचा यथोचित सन्मान करावा. त्यानी सांगीतल्या प्रमाने विज्ञानाचि कास धरत असतानाच ' सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ' हे तत्व सांगनाऱ्या आपल्या हिंदू संस्कृतिचा वारसा तुम्ही आम्ही अभिमानाने सांगितला पाहिजे,जोपासला पाहिजे. हिंदू म्हणून आपली असलेली सांस्कृतिक ओळख घेउन आपण जगासमोर जायला पाहिजे. हिंदू समाजाच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा,सहिष्णुतेचि शिकवन घेउन जगापुढ गेल पाहिजे.
आज जयंती निमित्त स्वातंत्र्यवीराना विनम्र अभिवादन !